Monday 25 September 2017

पियूष गोयलच्या हस्तक्षेपानंतर रेल्वेच्या खान पान पदार्थांवर एमआरपी छापणे झाले बंधनकारक 

रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्या आदेशानंतर रेल्वे बोर्डाने रेल्वेत विकल्या जाणा-या खान पान पदार्थांच्या पैकेटवर ज्या बाबी छापण्याचे निर्देश जारी केले होते त्यात आता एमआरपी छापने करणे बंधनकारक नव्हते. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या तक्रारीची ताबडतोब दखल घेत नवीन परिपत्रक जारी करत एमआरपी छापणे  बंधनकारक केले आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी रेल्वेच्या यापूर्वीच्या विचित्र आदेशाविरोधात रेल्वे मंत्री पियूष गोयल आणि आदेश जारी करणारे संजीव गर्ग यांस पत्र पाठवित झालेली घोडचूक लक्षात आणून दिली होती. संजीव गर्ग जे रेल्वे बोर्डच्या टुरिझम आणि कॅटरिंगचे अतिरिक्त सदस्य आहेत त्यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्या आदेशानुसार एक निर्देश जारी केला आहे त्यात खान पान पदार्थावर ज्या बाबी छापणे आवश्यक आहे त्यात पुरवठादार किंवा कंत्राटदारांचे नाव, शाकाहारी किंवा मांसाहारी, वजन आणि पॅकिंग दिनांक याचा उल्लेख केला आहे. रेल्वेत एमआरपी पेक्षा जास्त भावाने खान पान पॅकेट विकण्याच्या सर्वाधिक तक्रारी असताना हीच बाब वगळली गेली आहे. अनिल गलगली यांच्या तक्रारीची माहिती मुंबई भाजपाचे प्रवक्ते प्रो.भालचंद्र शिरसाट यांनी या प्रकरणी गोयल यांस संपर्क केला होता. त्यानंतर 25 सप्टेंबर 2017 रोजी संजीव गर्ग यांनी पूर्वीच्या परिपत्रक बदल करत त्यात एमआरपी आणि विक्रीची किंमत छापणे बंधनकारक केले आहे.

अनिल गलगली यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांचे आभार मानले असून यामुळे होणा-या लुटीवर अंकुश राहील,असे मत व्यक्त केले.

No comments:

Post a Comment