Monday 24 October 2022

बालयोगी श्री सदानंद महाराज आश्रम को 69 गुंठा भूमि देने की मांग पर सकारात्मक विचार करने का मुख्यमंत्री का आश्वासन

महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने उत्तर प्रदेश के पूर्व राज्यपाल राम नाईक के प्रतिनिधिमंडल को आश्वासन दिया कि बालयोगी श्री सदानंद महाराज आश्रम को सरकार वसई के पास तुंगारेश्वर पर्वत पर 69 गुंटा जमीन देने पर सकारात्मक विचार करेगी। इस प्रतिनिधिमंडल में आश्रम के सचिव केदारनाथ म्हात्रे एवं भाजपा के प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर उपस्थित थे।

वन संरक्षण अधिनियम, 1980 और वन्यजीव संरक्षण अधिनियम, 1972 के तहत संरक्षित भूमि के आवंटन के लिए राज्य सरकार से 'अनापत्ति पत्र' की आवश्यकता होती है। चूंकि यह मामला तीन साल से महाराष्ट्र सरकार के पास लंबित है। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वन मंत्री, संबंधित मामलों को संभालने वाले उच्च अधिकारी के अलावा  आश्रम के तीन प्रतिनिधियों, स्वयं राम नाईक और सरकार से मामले को लेकर फॉलो अप करने वाले आरटीआई विशेषज्ञ अनिल गलगली के संयुक्त बैठक की मांग की। राम नाईक की मांग के बाद मुख्यमंत्री ने तद्नुसार बैठक बुलाने का वादा किया।

अनिल गलगली ने चार अलग-अलग आवेदन दाखिल किए हैं जिनमें निम्नलिखित मांगें की गई हैं। (1) आश्रम को 69 गुंठा भूमि दी जानी चाहिए। (2) भक्तों के आश्रमों में प्रवेश पर प्रतिबंध हटा दिया जाना चाहिए। (3) सातिवली से तुंगारेश्वर अभयारण्य में बॉक्ससाइट खदान तक मौजूदा 7.80 किमी सड़क की मरम्मत की जाए। (4) परशुराम कुंड और तुंगारेश्वर महादेव मंदिर को 2005 में 'सी' तीर्थ का दर्जा दिया गया था और पिछले 17 वर्षों में सरकार द्वारा कोई विकास कार्य नहीं किया गया है।

राम नाईक ने मुख्यमंत्री का आभार व्यक्त करते हुए कहा कि मुख्यमंत्री के साथ सकारात्मक चर्चा हुई है और आश्रम और भक्तों की समस्याओं का समाधान संयुक्त बैठक के माध्यम से किया जाएगा। इसके अलावा राम नाईक की दो प्रसिद्ध पुस्तकें 'चारैवेती! चरैवेती !!' और 'कर्म योद्धा राम नाईक' मुख्यमंत्री को भेंट दी।

बालयोगी श्री सदानंद महाराज आश्रमास 69 गुंठे जमीन देण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

वसई जवळील तुंगारेश्वर पर्वतावरील 69 गुंठे जमीन बालयोगी श्री सदानंद महाराज आश्रमास देण्याचा सकारात्मक विचार सरकार करील असे आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर प्रदेशाचे माजी राज्यपाल राम नाईक यांच्या शिष्टमंडळास दिले. यावेळी आश्रमाचे सचिव केदारनाथ म्हात्रे आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर उपस्थित होते.

वन संरक्षण कायदा, 1980 आणि वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अन्वये संरक्षित जमीन देण्यासाठी राज्य सरकारचे ‘ना हरकत पत्र’ लागते.  हे प्रकरण महाराष्ट्र सरकारकडे तीन वर्षे अनिर्णीत असल्यामुळे त्याबद्दलचा सकारात्मक निर्णय लवकर करण्यासाठी मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. वन मंत्री, संबंधित प्रकरण हाताळणारे उच्चाधिकारी, तसेच आश्रमाचे तीन प्रतिनिधी, स्वतः राम नाईक आणि या प्रकरणी पाठपुरावा करणारे विशेषज्ञ अनिल गलगली यांची संयुक्त बैठक घेण्याची मागणी राम नाईक यांनी केली.  त्याप्रमाणे बैठक बोलावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले.

अनिल गलगली यांनी चार स्वतंत्र अर्ज केले असून त्यामध्ये पुढील मागण्या केल्या आहेत. (1) 69 गुंठे जमीन आश्रमास देण्यात यावी. (2) भाविकांना आश्रमात जाण्यासाठी असलेला प्रतिबंध हटविण्यात यावा.  (3) तुंगारेश्वर अभयारण्यात अस्तित्त्वात असलेल्या सातीवली ते बॉक्साईट खाणीपर्यंतचा 7.80 किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी.  (4) परशुराम कुंड आणि तुंगारेश्वर महादेव मंदिराला ‘क’ तीर्थस्थळाचा दर्जा 2005 मध्ये देण्यात आला असून गेल्या 17 वर्षात सरकारने कोणतीही विकासाची कामे केली नाहीत.

मुख्यमंत्री यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून संयुक्त बैठकीद्वारे आश्रमाचे आणि भाविक जनतेचे प्रश्न सुटतील असा विश्वास श्री राम नाईक यांनी व्यक्त करून मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले.  याशिवाय राम नाईक यांची दोन गाजलेली पुस्तके ‘चरैवेति! चरैवेति!!’ आणि ‘कर्मयोद्धा राम नाईक’  मुख्यमंत्र्यांना राम नाईक यांनी दिली.